कल्याण रेल्वे स्टेशनवरून मारवाडसाठी निघालेले वृद्ध बेपत्ता !
अक्षराज : भानुदास गायकवाड
दि.०१, कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशनवरून एक वृद्ध व्यक्ती बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील सिवास गावचे रहिवासी ५८ वर्षीय कालूराम दीपारामजी चौधरी हे २९ मेच्या रात्री हडपसर-जोधपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसने मारवाड जंक्शनसाठी घरातून निघाले होते. मात्र ते ना ठरलेल्या गंतव्यस्थळी पोहोचले आणि ना बदलापूरमधील आपल्या घरी परतले.

कालूराम चौधरी यांचे पुत्र सुरेश चौधरी यांनी सांगितले की, त्यांनी स्वतः आपल्या वडिलांना कल्याण रेल्वे स्टेशनवर ट्रेनमध्ये बसवण्यासाठी आणले होते. मात्र, स्टेशनवर खूप गर्दी असल्याने ते प्लेटफॉर्म क्रमांक ७ वर वडिलांपासून वेगळे झाले आणि त्यानंतर कालूराम यांचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही.
परिवार अत्यंत चिंतेत असून मुंबईसह आसपासच्या सर्व रेल्वे स्थानकांवर शोध घेतला गेला आहे. मात्र अद्याप कुठलाही ठोस सुराग मिळालेला नाही. दरम्यान, कल्याण लोहमार्ग पोलीस स्टेशनने सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून बेपत्ता वृद्धाचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
कोणालाही या वृद्धाबद्दल माहिती असल्यास कृपया नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. अन्यथा पुढील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा मोबा.९९८७४९१६८५