नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – खा. ओमप्रकाश राजे निंबाळकर
अक्षराज : विकास वाघ
दि.०३ ,धाराशिव : मान्सुनपुर्व पाऊस धाराशिव जिल्हयात सरासरीपेक्षा जास्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तुळजापुर तालुक्यातील काक्रंबा येथील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शेती पिकाची व झालेल्या नुकसानीची पहाणी केली.

काक्रंबा येथील महादेव पाटील (यांच्या गट नं. ३८८) यांच्या रब्बी हंगामातील ज्वारी पिकाचे ०० हे ४० आर मोठे नुकसान झाले आहे. तसेच चन्नाप्पा वट्टे यांचे (गट नं. ८१९) टोमॅटो पिकाचे ०० हे २० आर क्षेत्रावरील मान्सुनपुर्व पावसामुळे झालेल्या नुकसानीची तुळजापुर तहसिलचे तहसिलदार श्री. अरविंद बोळंगे, तलाठी पाटील मॅडम, कृषी सहाय्यक श्री. कापसे यांच्या उपस्थितीत पहाणी करुन झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करणेबाबत संबंधीत अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.
(हे वाचले का ?👇🏻)
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर…
https://aksharaj.in/नाशिकच्या-सिंहस्थ-कुंभमे
यावेळी चेतन बंडगर, दिपक भिसे, कार्तीक वाघमारे, कालीदास खताळ, श्रीराम मोगरकर यांच्यासह स्थानिक पत्रकार बांधव उपस्थित होते. तसेच परीसरातील शेतकरी व नागरीक यांची उपस्थिती होती.