पाकिस्तानी झेंडा पायदळी तुडवून वधूसह वऱ्हाडींनी केला निषेध

Spread the love

अक्षराज : विनोद वास्कर

दि.११, बोनकोडे( नवी मुंबई) : आगरी-कोळी समाजातील लग्नसोहळ्यातील हळदीच्या कार्यक्रमाला सर्वाधिक महत्त्व आहे. हल्ली मौजमजा म्हणून रात्री हळदीची धुळवड आणि नाचगाणी हे प्रकार चालत असले तरी मूळ परंपरेनुसार हळदीचा विधी आधीच होतो. मात्र, नवी मुंबईतील बोनकोडे गावातील एका मुलीच्या लग्नाच्या हळदी समारंभात पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ९ मे रोजी रात्री पाकिस्तानी झेंडे पायदळी तुडवून जाहीर निषेध करण्यात आला. आगरी कोळी समाजातील हळदी समारंभात जेवणावळीसाठी हजारो रुपयांची उधळण होते.

देशभक्तीपर गाण्यांवर नृत्य

गर्भश्रीमंत वधू – वर मंडळी असेल तर अमाप खर्च केला जातो. मात्र, अलीकडेच झालेल्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २७ पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले. , संपूर्ण घटनेने देशभर संताप व्यक्त केला जात असून, या भ्याड अतिरेकी हल्ल्याचा निषेध म्हणून राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या बोनकोडे गावात प्रदीप म्हात्रे यांची मुलगी ऐश्वर्या हिच्या लग्न सोहळ्यात ९ मे रोजी हळदीचा कार्यक्रम झाला.

कार्यक्रमादरम्यान पाकिस्तानी झेंडा पायदळी तुडवून त्यावर नवरी, करवल्या आणि सगेसोयरे, नातेवाइकांनी देशभक्तीपर गाण्यावर नृत्य करून पाकिस्तानी लोकांचा जाहीर निषेध करण्यात आला. विशेष म्हणजे हळदीच्या मंडपात भारत देशाच्या प्रतिकृतीचे दर्शन घडवून भारतीय ध्वजास साजेसा तिरंगा हाती घेऊन हळदी सोहळ्यातील उपस्थित लोकांनी नाच-गाणी सादर करून

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!