मुंबई /कोकण

Uncategorized, मुंबई /कोकण, सामाजिक

खबरदार ! रेल्वे गाड्यांवर रंगाचे फुगे मारल्यास पोलिसांकडून होणार सक्त कारवाई…

अक्षराज : विश्वनाथ शेनोय
दि.१३, डोंबिवली (ठाणे) :
डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे व ठाण्यातील अधिकारी अंमलदार यांनी होळी सणाच्या अनुषंगाने शाळेत जाऊन जनजागृती कार्यक्रम घेतले. त्यासोबत दि.१२ रोजी डोंबिवली रेल्वे स्टेशन लगत असलेले शास्त्रीनगर झोपडपट्टी ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बनकर, तायडे आणि तीन अंमलदार यांनी तिथल्या नागरिकांना दि.१३ रोजी होळी आणि दि.१४ रोजी धुलीवंदन सण साजरा करताना रेल्वे गाड्यांवर कोणत्याही पाण्याच्या भरलेल्या पिशव्या, फुगे किंवा तत्सम पदार्थ फेकू नये.

यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये दरवाजावर उभे असलेले व खिडकी बसलेल्या प्रवाशांना गंभीर इजा होऊ शकतात व कायमस्वरूपी अपंगत्व सुद्धा येऊ शकते. आपले सण कोणालाही कोणत्याही प्रकारच्या इजा न होता गुण्या गोविंदाने आपल्या विभागात मोकळ्या जागेवर साजरे करावे आणि हानीकारक रंगाचे पदार्थ अंगावर लावून नाये. रेल्वे गाड्यांवर कोणतेही पदार्थ, दगड पाण्याच्या पिशव्या, फुगे मारून इतर तत्सम पदार्थ फेकून इजा करणाऱ्या इसमावर १२५,१२५(a) १२५(b)बीएन एस, १५२भारेका अन्वय कारवाई करण्यात येईल, यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. रेल्वे ट्रॅकवर कोणतही अनुचित प्रकार निदर्शनात आल्यास रेल्वे पोलीस हेल्पलाइन १५१२ या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा असेही आवाहन डोंबिवली लोहमार्ग पोलीस यांच्याकडून करण्यात आले आहे.

गुन्हेगारी, ताज्या बातम्या, मुंबई /कोकण

विशेष अंमली पदार्थ पथक आणि रामनगर पोलीसांची धडक कारवाई

अक्षराज : विश्वनाथ शेनोय

दि.२८, कल्याण (ठाणे) : दि २८/०१/२०२५ रोजी विशेष पथकातील पोलीस उप निरीक्षक/प्रसाद चव्हाण यांना मिळालेल्या गुप्त बातमीचे अनुषंगाने डोंबिवली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुन्हे) /पंकज भालेराव, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो.हवा. प्रशांत सरनाईक, पोशि निलेश पाटील, तसेच पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, कल्याण यांचे पथकातील पो.उप निरी/ प्रसाद चव्हाण, पोशि राजेंद्र सोनवणे, पोना शांताराम कसबे, पोशि गौतम जाधव असे चोळेगांव तलाव, डोंबिवली पूर्व येथे मिळालेल्या बातमीप्रमाणे सापळा लावुन थांबलेले असतांना, दुपारी १३:०५ वा. चोळेगांव तलाव, शिवमंदीराजवळ, डोंबिवली पुर्व येथे दोन इसम त्यांचे नांव १) सचिन रूलिया मोरे, वय २१ वर्षे, राह. ग्राम-मोहला, ता. सेंधवा, ठाणा-ग्रामीण, जि. बरवानी, राज्य-मध्यप्रदेश, २) संजु राजाराम लुहार, वय २४ वर्षे, राह. घर नं. ३, वॉर्ड नं.१, ग्राम-इनाहीकी, ता./ठाणा-वरला, जि. बरवानी, राज्य मध्यप्रदेश हे आले, त्यांना थांबवुन, त्यांचेकडील बॅगेची झाडती घेतली असता, सदरच्या दोन्ही इसमांचे ताब्यातील बॅगेमध्ये २२ किलो, ८८९ गॅम वजनाचा ४,५७,७८०/- रुपये किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ मिळुन आला असुन, सदर आरोपीत यांना पंचासमक्ष ताब्यात घेवुन, त्यांचे ताब्यात मिळुन आलेला गांजा हा अंमली पदार्थ जप्त केला असुन, त्याचेविरुद्ध डोंबिवली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपी यांना अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीचे ताब्यात मिळुन आलेला गांजा अंमली पदार्थ हा त्याने कोठुन व कोणाकडुन आणला आहे, तसेच तो येथे कुणाला विक्री करणार आहे, याबाबत अधिक तपास सुरू आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक/अच्युत मुपडे, नेम. डोंबिवली पोलीस ठाणे हे करित आहेत.

डोंबिवली पोलीस स्टेशन व पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, कल्याण पथकाचे संयुक्तपणे दिनांक २७/०१/२०२५ रोजी व दि. २८/०१/२०२५ रोजी करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान एकुण ५,९७,७८०/- रुपये किंमतीचा २९ कि. ९५५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलेला असुन एकुण ३ आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त, ठाणे शहर, आशुतोष डुंबरे साो, पोलीस सह आयुक्त, ज्ञानेश्वर चव्हाण ,अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, संजय जाधव, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ कल्याण,अतुल झेंडे सुहास हेमाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग, डोंबिवली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डोंबिवली पोलीस ठाणे / गणेश जवादवाड यांचे मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस स्टेशनचे पोनि (गुन्हे) / पंकज भालेराव, सपोनिरी/‌ईश्वर कोकरे यांचेसह पोहवा / प्रशांत सरनाईक, पोशि/मंगेश वीर, पोशि/ निलेश पाटील, तसेच परिमंडळ ३ कल्याण यांचे पथकातील पोउपनिरी/ प्रसाद चव्हाण, पोशि राजेंद्र सोनवणे, पोना शांताराम कसबे, पोशि गौतम जाधव यांनी केलेली आहे.

ताज्या बातम्या, मुंबई /कोकण, राजकीय

शिंदे गटाने हिंदुत्व ८ हजारात विकले का ?

मुस्लिमांना ८ हजारात स्टॉल देऊन दिव्यातील शिंदे गटाने हिंदुत्व ८ हजारात विकले का ?
शिवसेना ठाकरे गटाच्या रोहिदास मुंडेंचा शिंदे गटाला टोला
अक्षराज :विनोद वास्कर

दि. २९, दिवा (ठाणे) : शिंदे गटाच्या शहरप्रमुखामार्फत दिवा शहरात दिवा महोत्सव सुरू असून येथे मुस्लिमांना ८ हजारात व्यावसायिक स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. परिणामी हिंदुत्वावरून उद्धव साहेबांवर टीका करणाऱ्या शिंदे गटाने ८ हजार रुपयात हिंदुत्व विकलं का ? असा सणसणीत टोला शिवसेना ठाकरे गटाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी लगावला आहे.

शिंदे गटाच्या भूमिकेवर आक्षेप घेताना रोहिदास मुंडे यांनी शिंदे गटाच्या दिवा शहरप्रमुखाच्या कृतीवर बोट ठेवले आहे. एकीकडे उद्धव साहेबांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर घेरणारे शिंदे गट स्वतः मात्र दिवा महोत्सव मध्ये पैशांसाठी मुस्लिम व्यवसायिकांना संधी उपलब्ध करून देतात यांनी केलं तर ते चालतं मात्र उद्धव साहेबांनी माणूसकीच्या दृष्टिकोनातून सर्व धर्मांना समान वागणूक दिली तर मात्र ते उद्धव साहेबांवर हिंदुत्व सोडण्याचा आरोप करतात. दुतोंडी भूमिका असणाऱ्या शिंदे गटाचा बुरखा दिवा महोत्सव मधील व्यावसायिक गाळे मुस्लिम व्यक्तींना आठ हजारात दिल्याने फाटला गेला असल्याचे रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या, मुंबई /कोकण, राजकीय

मुंब्रातील अनधिकृत बांधकारावरून भाजप आक्रमण


अक्षराज : विनोद वास्कर
दि. २०, मुंब्रा (ठाणे) :
मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून गुरुवारी अनधिकृत बांधकामाबाबत भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. केवळ मुंब्राच नव्हे तर सर्व प्रभाग समिती क्षेत्रातील अनाधिकृत बांधकामाबाबत आंदोलन छेडणार असल्याचा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला आहे.

येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लागणार असून राजकीय पक्षांकडून पुन्हा एकदा अनाधिकृत बांधकामाचा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात गुरुवारी अनाधिकृत बांधकामाबाबत आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन करताना मुंब्रा मध्ये कशा पद्धतीने विकास झालेला नाही हे दाखवण्यात आले. मुंब्रात सध्या ३५ ते ४० अनाधिकृत बांधकामे सुरू असून यावर पालिकेच्या अधिकाऱ्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. मुंब्रात पुन्हा एकदा लकी कंपाऊंड करायचे आहे का? असा प्रश्न संजय वाघुले यांनी उपस्थित केला आहे. केवळ मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात नव्हे तर संपूर्ण ठाणे महापालिका क्षेत्रात अनाधिकृत बांधकामे सुरू असून आता सर्वच प्रभाग समिती क्षेत्रात आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा ठाणे भाजपच्या वतीने देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या, मुंबई /कोकण

२० वर्षापेक्षा जुन्या गाड्यांची नोंदणी रद्द करणे आवश्यक 

अक्षराज : जे के. पोळ 

दि.२१, ठाणे : मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या निर्णयान्वये, २० वर्षांपेक्षा जास्त आयुर्मान झालेल्या काळ्या-पिवळ्या जीप टॅक्सीची नियमानुसार नोंदणी रद्द करणे आवश्यक आहे. तथापि अशी वाहने प्रवासी वाहतुकीसाठी वापरली जातात. अशा वाहनांमुळे अपघात होऊन रस्त्यावरील इतर वाहने तसेच प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होतो. नोंदणी वैधता संपलेल्या वाहनांची तपासणी करण्यात येत असून ही वाहने जप्त करण्याची कार्यवाही परिवहन विभागामार्फत सुरु आहे.

तरी २० वर्षांपेक्षा जास्त आयुर्मान होऊन नोंदणी वैधता संपलेल्या वाहनांच्या परवाना धारकांनी काळ्या-पिवळ्या जीप टॅक्सी परवाना रद्द करून नवीन वाहन परवाना काढून घ्यावा. त्याचप्रमाणे काळ्या-पिवळ्या जीप टॅक्सीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी एम-परिवहन ॲपचा वापर करून वाहनाच्या नोंदणी क्रमांकानुसार वाहनांची नोंदणी वैधता / योग्यता प्रमाणपत्र वैधता संपलेली आढळून आल्यास अशा वाहनांतून प्रवास करू नये, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी नागरिकांना केले आहे.

ताज्या बातम्या, मुंबई /कोकण, राजकीय

आज २२ लाख मतदार ठरवणार उमेदवारांचे भवितव्य मत पेटीत बंद


अक्षराज : हरी कापसे
दि.२०, तलासरी :
काल दि.२० नोव्हेंम्बर२०२४ रोजी सकाळी ७वाजे पासून ते सायंकाळी६वाजेपर्यंत मतदान केंन्द्रावर मतदान करण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली.जिल्ह्यातील सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी सोमवारी संध्याकाळी ५वा.संपली व मतदारांशी संपर्क व भेटीगाठी सुरु झाली. यावेळी पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघात निवडणुकीच्या रिंगणात एकूण ५३उमेदवार रिंगणात उभे आहेत.त्यात डहाणू मतदार संघात-८, विक्रमगड मतदार संघात-११, पालघर मतदार संघात-९,बोईसर मतदारसंघात-६ नालासोपारा मतदारसंघात-१२ तर वसई मतदारसंघात-७ असे ५६ उमेदवार रिंगणात उभे आहे.

विनोद मेढा यांचा विजय निश्चित अती लोक प्रियतेमुळे मतदारांचे मत
विनोद मेढा यांचा विजय निश्चित अती लोक प्रियतेमुळे मतदारांचे मत….

२२ लाख ९२ हजार ६६मतदार आहेत. हे एवढे मतदार ठरविणार आजच्या निवडणुकीत उमेवारांचे भवितव्य मतदान पेटीत डहाणूत विनोद निकोले समोर भाजपा-महायुतीचे युवा कणखर नेतृत्व सुशिक्षित मनमिळावू विनोद मेढा यांना मतदारांकडून अधिक लोकप्रियता दिसून आल्याने १०१% निवडून येण्याची शक्यता दिसून आली. त्यात निवडणुकीच्या मतदाना साठी अवघा एक दिवस शिल्लक राहिला असतांना डहाणू विधानसभेचे बहुजन विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार (बविआ)सुरेश पाडवी यांना निवडणूक रिंगणात निवडून येण्याची शक्यता नसल्याने निवडणुकीत मते खाण्यापेक्षा योग्य उमेदवाराला मते मिळावी यासाठी यांनी पुन्हा भाजपाचे जिल्ह्याध्यक्ष भरत राजपूत यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश केला. सुरेश पाडवी यांनी ऐनवेळी भाजपात प्रवेश केल्याने भाजपा उमेदवाराला अधिक मते मिळून मतांची टक्केवारी वाढतांना दिसेल व विनोदजी मेढा यांचा विजय निश्चित झाला आहे. तर बविआ पक्षाला मोठा धक्का बसल्याची चर्चा दिसली. यावेळी तलासरीत संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान झाल्याचे सांगितले.

ताज्या बातम्या, मुंबई /कोकण, राजकीय

कल्याण ग्रामीणचे उमेदवार राजू पाटील यांचा वचननामा जाहीर

अक्षराज: विनोद वास्कर
दि. १८, कल्याण( ठाणे) :
कल्याण ग्रामीणचे विधानसभेचे मनसेचे उमेदवार प्रमोद रतन पाटील यांना हक्काचा राजू दादा म्हणून ओळखले जातात. हाच हक्काचा माणूस आज पुन्हा एकदा कल्याण ग्रामीण विभागातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून आमदारकी लढवत आहे. मागच्या वेळी कल्याण ग्रामीण विभागातून विधानसभेतून निवडून आले होते. राजू पाटील यांनी आमदार म्हणून पदभार स्वीकारताच आपल्या माय भगनींच्या सुरक्षेसाठी सर्वप्रथम शक्ती कायदा यावा यासाठी आग्रही भूमिका घेतली.आणि आता ते विधेयक सहमत होऊन लवकरच तो कायदा होईल.आगरी भूमिपुत्रांच्या जमिनीवर उभे राहत असलेले नवी मुंबई अंतराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील यांचे नाव मिळावे यासाठी भूमिपुत्रांच्या खांद्याला खांदा लावून संघर्ष केला. याबाबत दिल्लीत झालेल्या बैठकीला उपस्थित राहून या मुद्द्यावर आपल्या समाजाचे नेतृत्व केले. कल्याण ग्रामीण विभागात असलेल्या २७ गावातील विकासाला गती दिली. तसेच १४ गाव विकास समितीसह त्यांच्या हक्कासाठी सरकारशी झगडले. स्थानिक स्वराज्य संस्थाद्वारे इथल्या विभागावर करण्यात येणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. कोरोनाच्या महामारीत देखील आमदार राजू दादा पाटील आणि त्यांचे मनसे सहकारी रस्त्यावर उतरून लढत होते.आमदार राजू दादा पाटील यांनी पाच वर्षात कल्याण ग्रामीण भागामध्ये जे काही काम केलं आहे ते नागरिकांनी पाहिलं आहे. राजू दादा पाटील यांनी एक लोक प्रतिनिधी म्हणून नाही तर एक तुमचा भाऊ व स्थानिक भूमिपुत्र म्हणून त्यांनी कार्य पार पाडली आहेत. ही माती, हा विभाग म्हणजे माझी मातृभूमी, माझी कर्मभूमी आहे. म्हणूनच कल्याण ग्रामीण बदलत आणि सर्वांच्या साथीने अधिक विकसित होत जाणार असा विश्वास आमदार राजू पाटील यांना आहे…

मा. आमदार राजू दादा पाटील यांनी दिवा डंपिंग, भंडारी डम्पिंग आणि डायघर कचरा प्रकल्प अशा सर्वच आंदोलनात समाज बांधवांसोबत लढा दिला. २७ गावाची स्वतंत्र नगरपालिका असावी यासाठी सर्वपक्षीय संघर्ष समिती आणि स्थानिकांसोबत अविरत लढा दिला. १४ गावाचा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये समावेश करून घेण्यासाठी सर्व पक्षीय विकास समिती व स्थानिकांसोबत खांदाला खांदा लावून विधिमंडळापर्यंत लढा दिला व या गावाचा नवी मुंबईमध्ये समावेश केला. हेदुटणे आणि उत्तर शिव गुरुचरण जागेच्या अन्यायकारक अधिग्रहणा विरोधात समाज बांधवांसोबत आंदोलन केले. सोनार पाडा येथील अन्यायकारक अधिग्रहण थांबून भूमिपुत्रांना अपेक्षित न्याय मिळवून दिला. आगरी वधू वर सामूहिक विवाह सोहळा संमती मार्फत आगरी समाजातील मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सहभाग घेतला. प्रत्येक वधू वरास प्रत्येकी एक लाखाचा धनादेश त्यांनी दिला आहे. यावर्षी तीन जिल्ह्यांमध्ये हा सोहळा राबवला जाणार आहे. सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये ५० जोडपांचे विवाह झाला तरी त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये दिले जाईल. असे आमदार राजू पाटील यांनी जाहीर केले आहे. या सर्व कामामुळेच आगरी समाजातील जनतेने मतदारांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यांनी वचननामा सुद्धा त्यांनी जाहीर केला आहे. कल्याण ग्रामीण मधल्या जनतेसाठी त्यांनी वचननामा मध्ये काय जाहीर केले आहे ते पुढील प्रमाणे
स्वर्गीय रतनबुवा पाटील आगरी कोळी व वारकरी भवनाचे दिनांक १२ फेब्रुवारी २०२८ रोजी लोकार्पण करणार, २७ गावांसाठी असलेली अमृत पाणी योजना २०१९ ते आता आजपर्यंत ८५% पूर्ण झाली ती येत्या मे पर्यंत टप्प्याटप्प्याने सुरू होणार, मुंबई महाराष्ट्रकरता रेल्वेचा स्वतंत्र बोर्ड असावा यासाठी पाठपुरवठा करणार, दिवा व काटई या दोन नवीन पोलीस स्टेशनच्या निर्मितीसाठी पाठपुरवठा सुरू असून लवकरच पूर्ण करणार, कल्याण डोंबिवली चा हक्काचा १४० एम एल डी अतिरिक्त पाणी कोठा मिळवून देणार, दिवा पाणीपुरवठा रिमोल्डिंग योजना व दिवा पश्चिमेचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी थूर लाईनचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी पाठपुरवठा करणार, कल्याण शिळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कल्याण फाटा महापे उड्डाणपूल तातडीने पूर्ण करून या रस्त्याला पर्यायी रस्ते तयार करण्यासाठी पाठपुरावा करणार, आयरे गाव विभागाला थेट रिंगरूटला जोडण्यासाठी पाठपुरावा करणार, म्हाताडी बुलेट ट्रेन स्टेशन परिसरात दळणवळण्यासाठी रस्त्याचे जाळे विकसित करण्यासाठी पाठपुरावा करणार, कोपर, दिवा, मुंब्रा, रेतीबंदर रेल्वे समांतर रस्त्यासाठी पाठपुरावा करणार, दिवा विभागातील महत्त्वाचे डि.पी रस्ते तयार करण्यासाठी पुढाकार घेऊन डि.पी लगतच्या जागा आर झोन करण्यासाठी पाठपुरावा करणार, खरवलीदेवी मंदिर रस्त्यासाठी वन विभागाकडे पाठपुरावा करणार, नेवाली चौकात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नवीन उड्डाणपूल मंजूर करून घेणार, दिवा पूर्व पश्चिम रेल्वे उड्डाणपुलाबाबतच्या अडचणी सोडवून तातडीने पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणार, एमआयडीसी मधील धोकादायक केमिकल कंपन्यांना बेल आऊट पॅकेज देऊन दुसरीकडे स्थलांतरित करून त्यांच्या जागी आय टी हब व ग्रोथ सेंटर उभारून त्या ठिकाणी स्थानिकांना नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेणार, क्लस्टर बाबत भूमिपुत्र व रहिवाशांच्या मागण्या सरकार दरबारी लावून सुटसुटीत व सर्वमान्य धोरण आणणार, निळजे, देसाई, खार्डी खाडी किनारी संरक्षक भित बांधून जॉगिंग ट्रॅक, गणेश घाट, गार्डन व पक्षी निरीक्षण केंद्र उभारण्यासाठी पाठपुरावा करणार, मतदार संघातील सर्व सरकारी शाळेचे एकच आदर्श मॉडेल तयार करण्यासाठी आराखडा तयार करीत आहेत.१४ गावासाठी अद्ययावत दवाखाना तयार करण्यासाठी पाठपुरावा करणार, कल्याण ग्रामीण क्षेत्रात महिलांना व बालकांसाठी स्वातंत्र्य दवाखान्यासाठी पाठपुरावा सुरू आहे तो येत्या काळात मार्गी लावणार, डायघर कचरा प्रकल्प विरोधात स्थानिकांसोबत राहणार, ठाणे महानगरपालिकेने आगासन बेतवडे व म्हाताडी गावातील भूमिपुत्रांच्या जागेवर टाकलेले सरसकट व अन्याधारक आरक्षण रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार, मतदारसंघातील सर्व नोंदणी युक्त बौद्ध विहार सुशोभित करणार, टोरंट विरोधी आंदोलनात भूमिपुत्रांसोबत राहिलो व राहणार, मतदार संघातील सर्व बचत गटाचे सबलीकरण करणार,२७ गावातील भूमिपुत्रांच्या जागेवर गरजेपोटी बांधिली घरे उल्हासनगरच्या धर्तीवर नियमित करण्यासाठी पाठपुरावा करणार, असे आश्वासन कल्याण ग्रामीण जनतेला वचननामामध्ये मा.आमदार राजू पाटील यांनी दिले आहे.

Scroll to Top